थोर संतांच्या मुखातून प्रकटलेली मानवी जीवनाला दिशा देणारी, नैतिक मूल्ये शिकवणारी अनमोल सुभाषिते आणि त्यांचे सोपे अर्थ.
अर्थ: सज्जनांशी आमचे वागणे मेणापेक्षाही मऊ असते, परंतु अन्यायाविरुद्ध लढताना आम्ही वज्रापेक्षाही कठीण बनू शकतो.
अर्थ: या जगातील दुष्ट लोकांची वाईट बुद्धी नष्ट होवो आणि त्यांची चांगल्या कामांबद्दलची ओढ व निष्ठा वाढो.
अर्थ: ऊस जरी वाकडा असला तरी त्यातील रस वाकडा नसतो, तसे माणसाचे शरीर कसेही असले तरी त्याचा अंतरात्मा शुद्ध असू शकतो. बाह्य रूपाला भुलू नका.
अर्थ: वेळेवर उठणे, नेहमी लढाईसाठी तयार राहणे, मिळालेले अन्न बांधवांमध्ये वाटून घेणे आणि स्वतः मिळवलेले अन्न खाणे हे चार गुण कोंबड्याकडून शिकण्यासारखे आहेत.
अर्थ: दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. तापलेल्या लोखंडाच्या सहवासामुळे पवित्र अग्नीलाही घणाचे घाव सहन करावे लागतात.
अर्थ: कनिष्ठ लोकांच्या संगतीने बुद्धी मंद होते, बरोबरीच्या लोकांच्या संगतीने ती तशीच राहते, तर विद्वान व श्रेष्ठ लोकांच्या सहवासाने ती अधिक प्रगल्भ बनते.
अर्थ: साहित्य, संगीत व कलेपासून वंचित असलेला माणूस म्हणजे शिंगे व शेपुट नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो, हे पशूंचे सुदैव आहे.
अर्थ: गवतापेक्षा कापूस हलका असतो आणि कापसापेक्षा याचक (मागणारा) क्षुद्र असतो. वारा त्याला उडवून नेण्यापासून घाबरतो, कारण 'हा माझ्याकडेही काही मागेल' अशी भीती वाऱ्याला वाटते.
अर्थ: सर्वच जुने योग्य असते असे नाही आणि नवीन आहे म्हणून ते वाईट ठरत नाही. सुज्ञ लोक स्वतः पारखून योग्य ते स्वीकारतात, तर मूर्ख लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय घेतात.
अर्थ: तुमची कीर्ती ऐकून कानांचे समाधान झाले, पण डोळे अतृप्त राहिले. कान आणि डोळ्यांमधील हाच वाद मिटवण्यासाठी मी तुमच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आलो आहे.
अर्थ: संकटात सापडला तरी सज्जन माणूस आपला चांगला स्वभाव सोडत नाही. कापूर जळतानाही आपला सुवास अधिकच पसरवतो.
अर्थ: विषातून मिळालेले अमृत, बालकाचे चांगले विचार, शत्रूमधील चांगले गुण आणि अस्वच्छ ठिकाणाहून मिळालेले सोने - या गोष्टी नेहमी गोळा कराव्यात.
अर्थ: चांगला मित्र चुकीच्या गोष्टींपासून रोखतो, हिताचे सांगतो, गुपिते जपतो, गुणांचे कौतुक करतो आणि संकटात साथ सोडीत नाही.
अर्थ: संतांचे दर्शन तीर्थक्षेत्रासारखेच पुण्यदायी असते. तीर्थयात्रेचे फळ मिळायला वेळ लागतो, पण संतांच्या सहवासाचा लाभ तत्काळ होतो.
अर्थ: गोड बोलण्याने सर्व जीव आनंदी होतात; म्हणून नेहमी प्रियच बोलावे. चांगले बोलण्यात कसला कंजूषपणा?
अर्थ: महाभारत हा ५ वा वेद, गुणी मुलगा ७ वा रस, उदार मनुष्य १५ वे रत्न आणि जावई हा ९ ग्रहांनंतरचा १० वा ग्रह मानला जातो.
अर्थ: राजा, देव, गुरू, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये; नेहमी काहीतरी भेट किंवा फळ घेऊन जावे.
अर्थ: काळ्या केसांनी पांढरा रंग धारण केला; जणू पांढरा असण्याचा स्वतःचा गुण केसांनी चोरल्याच्या रागानेच तोंडातील दात निघून गेले!
अर्थ: ज्या व्यक्तीला पाहिल्यावर, स्पर्श केल्यावर, तिचे ऐकल्यावर वा बोलल्यावर मन आनंदून विरघळते, त्यालाच खरा स्नेह (प्रेम) म्हणतात.
अर्थ: ज्याप्रमाणे थकलेला हत्ती झाडाच्या सावलीत विश्रांती घेऊन त्याच झाडाला उपटून टाकतो, तसाच नीच माणूस आश्रय देणाऱ्याचाच नाश करतो.
अर्थ: मद्यपानाने बुद्धी भ्रमित होते, भ्रमित बुद्धीने पाप घडते आणि पापी लोक दुर्गतीला जातात. म्हणून दारू कधीही पिऊ नये.
अर्थ: शांत राहणे, उशीर करणे, निघून जाणे, खाली पाहणे, आठी घालणे आणि भलतीच गोष्ट काढणे हे प्रत्यक्ष 'नाही' न म्हणता नकार देण्याचे ६ प्रकार आहेत.
अर्थ: साक्षर लोक भ्रष्ट/उलटले तर 'राक्षस' बनतात (साक्षरा उलट वाचल्यास राक्षस); पण सुसंस्कृत (सरस) माणूस उलटला तरी आपला सरसपणा आणि गोडवा सोडत नाही.
अर्थ: जास्त मऊ वागल्यास अपमान होतो आणि अति तापटपणाने वैर निर्माण होते. म्हणूनच या दोन्ही टोकांचा त्याग करून मध्यम मार्गाचा अवलंब करावा.
अर्थ: तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अविवेक यांपैकी एकच गोष्ट विनाशाला पुरेशी असते; मग जिथे चारही एकत्र येतात तिथे किती अनर्थ घडेल!
अर्थ: समर्थ माणसासाठी कोणतीही गोष्ट जड नसते, उद्योगी माणसासाठी कोणतेही अंतर दूर नसते. विद्वानासाठी कोणताही देश परका नसतो आणि गोड बोलणाऱ्या माणसाला कोणीही परका वाटत नाही.
अर्थ: कष्टाळूपणा, धाडस, धैर्य, बुद्धी, ताकद आणि पराक्रम — हे सहा गुण ज्याच्याजवळ असतात, त्याला देवही मदत करतो.
अर्थ: सत्य बोलणे श्रेयस्कर आहे; परंतु सत्यापेक्षाही जे हितकारक असेल ते बोलावे. ज्याने सर्व प्राण्यांचे अत्यंत कल्याण होईल तेच खरे सत्य होय.
अर्थ: मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, त्यात विद्या मिळणे अधिक कठीण. विद्या असूनही चांगले चारित्र्य असणे दुर्मिळ, आणि एवढे सर्व असूनही नम्रता असणारा माणूस तर अत्यंत दुर्मिळ असतो.
अर्थ: लोखंडावर पडलेले पाणी नष्ट होते, कमळाच्या पानावर ते मोत्यासारखे चमकते आणि शिंपल्यात पडल्यास खरा मोती बनते. माणसाची उत्तम, मध्यम वा अधम अवस्था ही त्याच्या संगतीवर अवलंबून असते.
अर्थ: मत्सर करणारा, तिरस्कार करणारा, असमाधानी, रागीट, सतत शंका घेणारा आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणारा — हे सहा लोक आयुष्यात नेहमी दुःखी असतात.
अर्थ: वस्त्रदानाने राज्य, चपलांच्या दानाने वाहन आणि तांबूल दानाने उपभोग मिळतो; परंतु अन्नदान केल्याने या तिन्ही दानांचे फळ एकत्र प्राप्त होते.
अर्थ: दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे मोहरीएवढे लहान दोषही लगेच शोधतो; पण स्वतःचे बेलफळाएवढे मोठे दोष दिसुनही न पहिल्यासारखे करतो.
अर्थ: कोणतीही कामे प्रयत्नाने व कष्टानेच पूर्ण होतात, केवळ मनात विचार करून (मनोरथाने) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी स्वतःहून येऊन शिरत नाहीत, त्यालाही शिकार करावीच लागते.
अर्थ: विद्या हे असे धन आहे ज्याला चोर चोरू शकत नाही, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, भावंडात त्याची वाटणी होत नाही आणि त्याचे ओझेही होत नाही. जेवढे खर्च करू (वाटत राहू) तेवढे ते रोज वाढतेच. म्हणूनच विद्याधन हे सर्व धनांत श्रेष्ठ आहे.
अर्थ: 'हा माझा आणि हा परका' असा विचार क्षुद्र (संकुचित) बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार अंतःकरणाच्या लोकांसाठी तर संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब असते.
अर्थ: नद्या स्वतःचे पाणी स्वतः पीत नाहीत, झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत आणि ढग स्वतः पिकवलेले धान्य स्वतः खात नाहीत. त्याचप्रमाणे सज्जन लोकांची संपत्ती व जीवन हे दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच (परोपकारासाठी) असते.
अर्थ: विद्या माणसाला नम्रता देते, नम्रतेमुळे पात्रता (योग्यता) येते, पात्रतेमुळे धन प्राप्त होते, धनाने सत्कार्य (धर्म) घडते आणि त्यातूनच खऱ्या सुखाची प्राप्ती होते.
अर्थ: बाहुभूषणे किंवा चंद्रासारखे चमकणारे मोत्यांचे हार माणसाची खरी शोभा वाढवत नाहीत; तर माणसाने आत्मसात केलेली आणि आत्मियतेने बोललेली 'संस्कृत/मधुर वाणी' हेच त्याचे खरे सौंदर्य व दागिना आहे.