॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
जगातील महान ऐतिहासिक महाकाव्य

श्रीमद्भगवद्गीता

॥ महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास ॥

डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!

महाभारतातील सर्व १८ पर्वांचा सविस्तर इतिहास आणि अध्यायनिहाय अनुवाद संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा संपूर्ण ग्रंथ डिजिटल स्वरूपात अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध केला जाईल.

महाभारताचा संक्षिप्त परिचय

महाभारत हा प्राचीन भारतातील अत्यंत पवित्र आणि भव्य संस्कृत काव्यग्रंथ आहे. मानल्या गेलेल्या परंपरेनुसार, महर्षी वेदव्यास यांनी सांगितल्याप्रमाणे श्री गणपतीने स्वतः आपल्या हाताने हा ग्रंथ लिहून घेतला. या ग्रंथाचे सुरुवातीचे नाव 'जय' (किंवा जयदिप) असे होते. पुढील काळात त्याचा विस्तार होऊन तो 'भारत' आणि शेवटी 'महाभारत' म्हणून जगभर प्रसिद्ध झाला.

हा ग्रंथ हिंदू धर्मातील 'पाचवा वेद' मानला जातो. महाभारतात १,१०,००० हून अधिक श्लोक असून, आकाराच्या दृष्टीने हा प्रसिद्ध ग्रीक महाकाव्ये 'इलियड' आणि 'ओडिसी' यांच्या एकत्रित विस्तारापेक्षाही सुमारे सात ते दहा पट मोठा आहे. यामध्ये वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, न्याय, युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र आणि योगशास्त्राचे गुढ रहस्य स्पष्ट केले आहे.

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं। द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ॥
लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌। पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥
(महाभारताची संपूर्ण कथा सांगणारा एकश्लोकी मंत्र)

इतिहासाचा मागोवा व कालनिर्णय

भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट आणि कालगणनेच्या पंचांग पद्धतीनुसार, कुरुक्षेत्रावरील महायुद्ध ई.स.पूर्व ३१३७ च्या सुमारास घडले. युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर 'युधिष्ठिर शक' सुरू झाला, त्यावरून या ग्रंथातील घटनांना सुमारे ५,००० वर्षे उलटून गेली आहेत.

महाभारताचे मूळ कथासार

कुरुवंशाचा आद्य पुरुष 'कुरुराजा' याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर सुवर्ण नांगराने जमीन नांगरून धर्मक्षेत्र 'कुरुक्षेत्र' भूमीची स्थापना केली. पुढे याच वंशात शंतनू राजा झाला. शंतनूचा विवाह गंगेसोबत झाला आणि त्यांच्या आठव्या अपत्याचे नाव देवव्रत (भीष्माचार्य) ठेवले गेले. शंतनूला सत्यवतीशी विवाह करायचा असल्याने, देवव्रताने आजन्म ब्रह्मचर्याची भीषण प्रतिज्ञा केली आणि ते 'भीष्म' नावाने ओळखले जाऊ लागले.

सत्यवतीपासून शंतनूला चित्रांगद व विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर कुरुवंश चालू ठेवण्यासाठी महर्षी व्यासांच्या नियोगातून जन्मांध धृतराष्ट्र, पांडुरोगी पांडू आणि अत्यंत नीतिमान विदुर यांचा जन्म झाला.

धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी झाला, ज्यांच्यापासून दुर्योधनासह १०० कौरव जन्माला आले. पांडू राजाचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला. कुंतीला मिळालेल्या वरामुळे धर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन आणि अश्विनीकुमारांपासून नकुल-सहदेव असे पाच पांडव जन्माला आले. (कुंतीला विवाहापूर्वी सूर्यापासून कर्ण हा तेजस्वी पुत्र झाला होता).

महाभारतातील १८ पर्वे (Partitions)

क्र. पर्वाचे नाव संक्षिप्त ओळख
आदि पर्वओळख, राजपुत्रांचा जन्म व शिक्षण
सभा पर्वराजसभा, द्यूतक्रीडा व पांडवांना वनवास
अरण्य पर्वपांडवांचा १२ वर्षांचा वनवास
विराट पर्वअज्ञातावासातील १ वर्ष (विराट नगरी)
उद्योग पर्वयुद्धाची पूर्वतयारी व शांतता प्रस्ताव
भीष्म पर्वमहायुद्धाचे पहिले १० दिवस व भगवद्गीता
द्रोण पर्वद्रोणाचार्य सेनापती असतानाचे युद्ध
कर्ण पर्वकर्ण सेनापती असतानाचे युद्धाचे वर्णन
शल्य पर्वयुद्धाचा शेवटचा दिवस व गदायुद्ध
१०सौप्तिक पर्वअश्वत्थामाने रात्री केलेला हल्ला
११स्त्री पर्वगांधारी व स्त्रियांनी केलेला शोक
१२शांति पर्वयुधिष्ठिराचा राज्याभिषेक व राजधर्म उपदेश
१३अनुशासन पर्वभीष्मांचा अंतिम उपदेश व विष्णुसहस्रनाम
१४अश्वमेध पर्वयुधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ
१५आश्रमवास पर्वधृतराष्ट्र, गांधारी, कुंतीचे वनाकडे प्रस्थान
१६मुसळ पर्वयादवांचे आपापसातील गृहयुद्ध
१७महाप्रस्थान पर्वपांडवांचे स्वर्गाकडे प्रस्थान
१८स्वर्गारोहण पर्वयुधिष्ठिराचा सदेह स्वर्गात प्रवेश

प्रमुख उपकथा व अंतर्भूत ग्रंथ

• श्रीमद्भगवद्गीता (भीष्म पर्व)

महाभारतातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'भगवद्गीता'. कुरुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाला मोह उत्पन्न झाला असता, श्रीकृष्णाने त्याला कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोगाचा दिलेला अमर उपदेश म्हणजे गीता होय.

• विष्णु सहस्रनाम (अनुशासन पर्व)

युद्धाच्या समाप्तीनंतर शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी धर्मराज युधिष्ठिराला विष्णूच्या १,००० नावांचे स्तोत्र (विष्णु सहस्रनाम) आणि राजधर्माचा सखोल उपदेश केला.

• नळ-दमयंती कथा व सावित्री-सत्यवान कथा (अरण्य पर्व)

पांडवांच्या वनवासाच्या काळात महर्षींनी त्यांना धीर देण्यासाठी नळ आणि दमयंतीची तसेच यमाकडून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सती सावित्रीची कथा सांगितली.

• विदुरनीती व सनत्सुजातीय

युद्धापूर्वी महात्मा विदुरांनी धृतराष्ट्राला दिलेला व्यावहारिक व नैतिक उपदेश 'विदुरनीती' म्हणून प्रसिद्ध आहे.

महाभारतावर आधारित गाजलेली पुस्तके व कादंबऱ्या

मृत्युंजय: शिवाजी सावंत (कर्णाच्या जीवनावरील कादंबरी)
ययाति: वि. स. खांडेकर (ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त)
राधेय: रणजित देसाई
युगान्त: इरावती कर्वे (पात्रांचे चिकीत्स्क विश्लेषण)
व्यासपर्व: दुर्गा भागवत
पर्व: डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद: सौ. उमा कुलकर्णी)
मी अश्वत्थामा चिरंजीव: अशोक समेळ
आर्याभारत: कवी मोरोपंत (१७,१७० आर्या)

🌏 महाभारतातील पृथ्वीचे मानचित्र व आधुनिक भूगोल:

महाभारताच्या भीष्म पर्वातील 'जंबुखंड-विनिर्माण पर्व' मध्ये सुदर्शन द्वीपाचे (पृथ्वीचे) वर्णन आरशात दिसणाऱ्या चंद्राच्या प्रतिमेसारखे केले आहे. यात पिंपळाची पाने आणि सशाचा आकार मिळून जे चित्र बनते, ते आजच्या जगाच्या नकाशाशी (World Map) तंतोतंत जुळते. तसेच चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तची नील नदी आणि लाल समुद्राचे स्पष्ट संदर्भ यात आढळतात.

सर्व ग्रंथ संपदा पाहा