॥ नामा म्हणे विठ्ठला ॥ नामदेव महाराज निवडक अभंग
नामदेव गाथा विशेष

लोकप्रिय अभंग :संत नामदेव महाराज

भक्तशिरोमणी संत नामदेव महाराजांच्या अलौकिक, प्रेमरसमय व भावपूर्ण अभंग रचना सार्थ भावार्थासह.

॥ अभंग १ ॥ अभंग रचना
तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनी कळिकाळा पाड नाही ॥४॥
संत नामदेव म्हणतात, माझ्यासाठी विठ्ठलच तीर्थ, क्षेत्र, देव आणि पूजा आहे. आई, वडील, भाऊ, नातेवाईक आणि गुरु असे सर्व काही विठ्ठलच आहे. मला विठ्ठल मिळाल्यामुळे आता काळाची किंवा संसाराची भीती राहिलेली नाही.
॥ अभंग २ ॥ अभंग रचना
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं ।
मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन ।
जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारीं ।
कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
जन्मोजन्मी पंढरपूरमध्ये राहावे, चंद्रभागेत स्नान करावे आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, एवढीच संत नामदेवांची इच्छा आहे. मुखात सतत देवाचे नाव आणि सर्व माणसांमध्ये देव पाहण्याचा भाव असावा.
॥ अभंग ३ ॥ अभंग रचना
नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महिमा साजे थोर तुज एका ॥१॥
रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती ।
चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
विठ्ठलाचे नाम घेतल्याने पंढरपूरचा परिसर भक्तीने भरून जातो. रिद्धी-सिद्धी, चारही वेद आणि देवसुद्धा विठ्ठलाची महती गातात. असा दयाळू विठ्ठल अनाथांचा आधार आहे.
॥ अभंग ४ ॥ अभंग रचना
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करू यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
देवा, तुझे नाव अमृतापेक्षाही गोड आहे, तरी माझे मन तुझ्यात का लागत नाही, अशी नामदेवांची खंत आहे. कीर्तनात बसल्यावरही मन विषयांकडे जाते. म्हणून ते देवाकडे मन स्थिर करण्याची विनंती करतात.
॥ अभंग ५ ॥ अभंग रचना
माझा भाव तुझे चरणीं ।
तुझें रूप माझे नयनीं ॥१॥
सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥
त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥
त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा ? ॥५॥
माझे प्रेम तुझ्या चरणी आहे आणि तुझे रूप माझ्या डोळ्यांसमोर आहे. देवाने माझी माया दूर केली आणि मी त्याच्या चरणी कायमचा जोडला गेलो. आता देव आणि भक्त यांच्यातील प्रेमाचे नाते इतके घट्ट झाले आहे की कोण कोणाला जिंकले हेच समजत नाही.
॥ अभंग ६ ॥ अभंग रचना
पंढरीची वारी जयाचिये कुळीं ।
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥
नामा म्हणे माझा सोयरा-जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥
ज्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा आहे, त्या वारकऱ्यांच्या पायांची धूळ मला मिळावी. विठ्ठलाच्या नामावर प्रेम ठेवणाऱ्या भक्तांपासून क्षणभरही दूर राहू नये. अशा भक्तांच्या सदैव जवळ पांडुरंग असतो.
॥ अभंग ७ ॥ अभंग रचना
आधीं रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हतें चराचर ।
तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा ।
तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटीं ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी ।
म्हणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचों पंढरपुरी ॥७॥
संत नामदेवांच्या भक्तिभावात पंढरपूर हे अत्यंत प्राचीन आणि अविनाशी तीर्थक्षेत्र आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वीही पंढरपूर होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. म्हणून श्रीहरीच्या पंढरीत भक्तांनी आनंदाने नाचावे.
॥ अभंग ८ ॥ अभंग रचना
डोलत डोलत टमकत चाले ।
गोजिरीं पाउलें टाकूनियां ॥१॥
पायीं रुणझुण वाजतात वाळे ।
गोपी पाहातां डोळे मन निवे ॥२॥
सांवळें सगुण मानस मोहन ।
गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥
सावळा श्रीकृष्ण सुंदर पावले टाकत डोलत आणि टमकत चालत आहे. त्याच्या पायातील वाळे रुणझुण वाजत आहेत. त्याचे सुंदर रूप पाहून गोपींचे मन शांत आणि आनंदी होते.
॥ अभंग ९ ॥ अभंग रचना
काळ देहासी आला खाऊं ।
आम्ही आनंदें नाचूं गाऊं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें ।
हें तों भगवंता मी नेणें ॥२॥
टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
माझें गाणें पश्चिमेकडे ॥३॥
नामा म्हणे बा केशवा ।
जन्मोजन्मीं द्यावी सेवा ॥४॥
मृत्यू कधीही येऊ शकतो, म्हणून त्याची भीती न बाळगता देवाच्या नामात आनंदाने नाचावे आणि गावे. संत नामदेवांची देवाकडे जन्मोजन्मी त्याची सेवा करण्याचीच मागणी आहे.
॥ अभंग १० ॥ अभंग रचना
पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारा ।
पतितपावन नव्हसी म्हणुनी जातों माघारा ॥१॥
घ्यावें तेव्हां द्यावें ऐसा अससी उदार ।
काय धरूनि देवा तुझें कृपणाचें द्वार ॥२॥
सोडीं ब्रीद देवा आतां नव्हेसि अभिमानी ।
पतितपावन नाम तुझें ठेविलें कोणी ॥३॥
झेंगट घेउनी हाती दवंडी पीटीन तिहीं लोकीं ।
पतितपावन देवा परि तूं मोठा घातकी ॥४॥
नामा म्हणे देवा तुझे नलगे मज कांही ।
प्रेम असोंदे चित्तीं म्हणूनि लागतसें पायीं ॥५॥
देवाला पतितांचा उद्धार करणारा म्हणतात, म्हणून नामदेव त्याच्याकडे आले आहेत. देवाने आपला पतितपावन हा ब्रीद खरा करावा आणि भक्तावर कृपा करावी, अशी ते प्रेमाने मागणी करतात.
॥ अभंग ११ ॥ अभंग रचना
विटेवरी उभा दीनांचा कैवारी ।
भेटाया उभारी दोन्ही बाह्या ॥१॥
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी ।
भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार ।
लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागीं देतो समान दरुशन ।
उभा तो आपण सम पायीं ॥४॥
नामा म्हणे तया संतांची आवडी ।
भेटावया कडाडी उभाची असे ॥५॥
विठ्ठल दीनांचा आधार आहे. तो भक्तांचे दोष न पाहता सर्वांना सारखे दर्शन देतो. लहान असो किंवा मोठा, प्रत्येक भक्ताची तो काळजी घेतो आणि संतांना भेटण्यासाठी सदैव आतुर असतो.
॥ अभंग १२ ॥ अभंग रचना
पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारा ।
पतितपावन नव्हसी म्हणुनी जातों माघारा ॥१॥
घ्यावें तेव्हां द्यावें ऐसा अससी उदार ।
काय धरूनि देवा तुझें कृपणाचें द्वार ॥२॥
सोडीं ब्रीद देवा आतां नव्हेसि अभिमानी ।
पतितपावन नाम तुझें ठेविलें कोणी ॥३॥
झेंगट घेउनी हाती दवंडी पीटीन तिहीं लोकीं ।
पतितपावन देवा परि तूं मोठा घातकी ॥४॥
नामा म्हणे देवा तुझे नलगे मज कांही ।
प्रेम असोंदे चित्तीं म्हणूनि लागतसें पायीं ॥५॥
देवाचे नाव पतितपावन आहे, म्हणजे पापी आणि दुःखी लोकांचा उद्धार करणारा आहे. म्हणून नामदेव देवाला सांगतात की हे नाव सार्थ करून भक्तावर कृपा कर. मला धन किंवा दुसरे काही नको, फक्त तुझ्या चरणी प्रेम हवे.
॥ अभंग १३ ॥ अभंग रचना
बोलूं ऐसे बोले ।
जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥
प्रेम सर्वांगाचे ठायीं ।
वाचें विठ्ठल रखुमाई ॥२॥
नाचूं कीर्तनाचे रंगीं ।
ज्ञानदीप लावूं जगीं ॥३॥
परेहुनि परतें घर ।
तेथें राहूं निरंतर ॥४॥
सर्वसत्ता आली हातां ।
नामयाचा खेचर दाता ॥५॥
आपले बोलणे असे असावे की त्यातून विठ्ठल प्रसन्न व्हावा. मनात सर्वत्र प्रेम असावे आणि मुखाने विठ्ठल-रखुमाईचे नाम घ्यावे. कीर्तनातून स्वतः ज्ञान मिळवावे आणि इतरांच्या जीवनातही ज्ञानाचा प्रकाश पसरवावा.
॥ अभंग १४ ॥ अभंग रचना
परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं ।
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगतरांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलों देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
परब्रह्म श्रीकृष्ण साध्या गोपांच्या घरातही प्रेमाने वावरतो आणि लोणी चोरतो. तो मोठा देव असूनही भक्तांच्या प्रेमाने त्यांच्यात मिसळतो. नामदेव त्याच्याकडे जन्मोजन्मी त्याच्या चरणांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात.
॥ अभंग १५ ॥ अभंग रचना
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठलनामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥
विठ्ठलाचेच नाम गावे आणि त्याचेच ध्यान करावे. तो अनाथांचा आधार आणि कृपेचा सागर आहे. त्याच्या नामस्मरणाने संसाराचे बंधन दूर होते आणि मनाला खरे सुख मिळते.
॥ अभंग १६ ॥ अभंग रचना
खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाई रे ॥१॥
क्रोध अभिमान केला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥२॥
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा ।
हार मिरविती गळा ॥३॥
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव ।
अनुपम्य सुखसोहळा रे ॥४॥
वर्ण अभिमान विसरली याती ।
एक एका लोटांगणी जाती ॥५॥
निर्मळ चित्ते झाली नवनीते ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥६॥
होतो जयजयकार गर्जत अंबर ।
मातले हे वैष्णव वीर रे ॥७॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥८॥
पंढरीच्या वाळवंटात भक्तीचा आनंदाचा सोहळा भरला आहे. वारकरी नाचत आहेत, टाळ-मृदुंग वाजत आहेत आणि सर्वजण जात-पात, क्रोध व अहंकार विसरून एकमेकांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. अशा भक्तीने संसारसागर पार करण्याचा मार्ग सोपा होतो.
॥ अभंग १७ ॥ अभंग रचना
जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत ।
तैसे सज्जनांचें चित्त ॥३॥
ज्यासि अपंगिता नाही ।
त्यासि धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगू किती ।
तोचि भगवंताच्या मूर्ती ॥६॥
जे दुःखी, गरीब आणि असहाय आहेत त्यांना जो आपले मानतो आणि त्यांच्याशी दया व प्रेमाने वागतो, तोच खरा संत आहे. अशा दयाळू माणसामध्येच देवाचे दर्शन घडते.
॥ अभंग १८ ॥ अभंग रचना
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ।
गे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥धृ॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू ।
मकार महेश जाणियेला ॥१॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ।
तो हा गजानन मायबाप ॥२॥
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी ।
पाहावी पुराणे व्यासाचिया ॥३॥
श्रीगणेशाचे रूप ओंकारमय आहे. ओंकारातील अ, उ आणि म या तीन अक्षरांत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे तत्त्व आहे. म्हणून गणपती हा या तिन्ही देवांच्या उत्पत्तीचे मूळ आहे, असे तुकाराम महाराज सांगतात.
॥ अभंग १९ ॥ अभंग रचना
नमिला गणपती, माऊली शारदा ।
आता गुरुराजा दंडवत ॥१॥
गुरुराया चरणी मस्तक ठेविले ।
आपल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥
गुरुराया तुज ऐसा नाही सखा ।
कृपा करी रंका धरी हाता ॥३॥
तुका म्हणे माता पिता, गुरु बंधू ।
तूची कृपा सिंधू गणपती ॥४॥
संत तुकाराम महाराज गणपती, सरस्वती आणि गुरु यांना नमस्कार करतात. गुरुच आई, वडील आणि भाऊ यांच्यासारखा आधार देणारा आहे. गणपती हा कृपेचा सागर आहे आणि त्याने भक्ताचा हात धरावा, अशी प्रार्थना आहे.
॥ अभंग २० ॥ अभंग रचना
आधीं रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हतें चराचर ।
तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा ।
तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटीं ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी ।
म्हणूनि अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचों पंढरपुरी ॥७॥
पंढरपूर हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वीही पंढरपूर होते, अशी संत नामदेवांची भक्तिभावातील श्रद्धा आहे. म्हणून श्रीहरीच्या पंढरीत भक्तांनी आनंदाने नाचावे आणि नामस्मरण करावे.
॥ अभंग २१ ॥ अभंग रचना
नाम गाऊं नाम घेऊ ।
नामें विठोबासी पाहूं ॥१॥
आम्ही दैवाचे दैवाचे ।
दास पंढरिरायाचे ॥२॥
टाळ दिंडी घेऊनि हातीं ।
केशवराज गाऊं गीतीं ॥३॥
नामा म्हणे लाखोली सदा ।
अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥
विठोबाचे नाम सतत घ्यावे आणि त्याचे नाम गात राहावे. आपण पंढरीच्या राजाचे सेवक आहोत, हे आपले मोठे भाग्य आहे. टाळ आणि दिंडी घेऊन भक्तीने विठ्ठलाचे नाम गावे आणि गोविंदाचे नाम वारंवार घ्यावे.
॥ अभंग २२ ॥ अभंग रचना
गातो आवडीने गोड तुझे नाम ।
तूच माझा रामा तूच घनश्याम ॥धृ॥
तूच माझी आई तूच माझा बाप ।
मुखी नाम घेता जाळीतोशी पाप ॥१॥
तूच सखा कृष्ण तुझा मी सुदाम ।
ध्यानीमनी चित्ती तूच पांडुरंगा ॥२॥
घोळीतो जिभेवर नित्य मी अभंगा ।
नको मज माया नश्वर ते दामा ॥३॥
विठ्ठला केशवा सत्यनारायणा ।
वारकऱ्या हाती दिसे टाळ वीणा ॥४॥
द्यावे मुक्तिदाना निश्चय हा ठाम ।
षडरिपू आता वारीले अनंता ॥५॥
वाहिले मी सारे भगवंता ।
कशाला फिरू मी ते चारी धाम ॥६॥
भक्ताला देवाचे नाम अत्यंत प्रिय आहे. राम, कृष्ण आणि पांडुरंग हेच त्याचे आई, वडील आणि सखा आहेत. नामस्मरण केल्याने पाप नष्ट होतात. संसारातील नश्वर गोष्टींपेक्षा देवाचे नाम श्रेष्ठ आहे आणि देवाच्या भक्तीने मुक्ती मिळते.
॥ अभंग २३ ॥ अभंग रचना
नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महिमा साजे थोर तुज एका ॥१॥
रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती ।
चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
विठ्ठलाच्या नामाचा जयघोष भीमेच्या तीरावर घुमत आहे. रिद्धी-सिद्धी, चारही वेद आणि देवसुद्धा त्याची महती गात आहेत. असा दयाळू विठ्ठल अनाथांचा आधार आहे.
॥ अभंग २४ ॥ अभंग रचना
घेता नाम विठोबाचे ।
पर्वत जळती पापांचे ॥१॥
ऐसा नामाचा महिमा ।
वेद शिणला झाली सीमा ॥२॥
नामे तारिले अपार ।
महापापी दुराचारी ॥३॥
वाल्या कोळी ब्रह्महात्यारी ।
नामे तारिला निर्धारी ॥४॥
सेना बैसला निवांत ।
विठ्ठल नाम उच्चारित ॥५॥
विठोबाचे नाम घेतल्याने मोठमोठी पापेही नष्ट होतात, असा नाममहिमेचा संदेश या अभंगात आहे. देवाचे नाम मनापासून घेतल्याने पापी आणि दुःखी जीवाचाही उद्धार होऊ शकतो.